सकाळी सकाळी - 'निघा'
*शनिवार - रात्र - अकरा वाजता*
आम्हीं 'मांगीतुंगी' येथील जैन मंदिर धर्मशाळेत विसावणार होतो. पण त्या आधी उद्या सकाळी कधी निघायचे यावर मतमतांतरे चर्चेतहोती. शेवटी संजीवनीने सांगितल्या प्रमाणे साडेपाच वाजता निघायचे ठरले. मला रात्रभर झोप लागली नाही, उल्काचं घोरणं रात्रभरऐकावं लागलं.
*रविवार - सकाळ - पाच वाजता*
शेखरने दरवाजा खटखटावला आणि चहाचं पाणी गरम करण्याची इलेक्ट्रिक किटली मागितली. मी भुवया वर करून 'कशाला?' असंविचारलं तर म्हणे 'संजीवनीला अंघोळीसाठी गरम पाणी हवं आहे !'. आम्हीं दोघंही मनातल्या मनात हसलो. दिवसाची सुरवात प्रसन्नतेतझाली.
बरोबर साडेपाच वाजता आम्हीं गाडीत बसलो आणि गाडी साल्हेर किल्ल्याकडे वळवली. अंतर तीस पस्तीस कि मी होतं पण रस्ताअनोळखी, निर्मनुष्य आणि खराब होता. पण याच कारणामुळे सूर्योदय होई पर्यंत मज्जा आली. पहाट सुखद अनुभव देत होती. सूर्योदयझाल्यावर निसर्गाचे जे दर्शन झालं ते शब्दात वर्णन करणे - अशक्य. किंचित अनुभव तुम्हांला व्हीडिओ बघून येईल - दहा टक्के फक्त. कारण व्हिडीओ बघून थंडी थोडीच वाजणार आहे? स्वर्गात स्वतःलाच जावं लागतं. 😷
महाराष्ट्र - गुजरात सीमेवर साल्हेर किल्ला आहे. हा डोंगर उंचीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथून गुजरात सीमा दोन कि मी वरआहे. दोन राज्यांच्या मध्ये एक प्रचंड दरी आहे. काल रोहित जाधव ( सटाणा येथील गड सेवक ) सांगत होता की - * बागलाण म्हणजेमहाराष्ट्रातील सर्वोच्च पठार.
सह्याद्रीचे उत्तर टोक म्हणजे साल्हेर. सह्याद्री पर्वत रांगेची सुरवात महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील साल्हेर ह्या किल्ल्यापासून होऊन ४४००किमीवरील केरल- तमिळनाडूतील मदाइ डोंगर रांगे पर्यंत पसरली आहे.* आज आम्हीं बऱ्याच लोकांना अज्ञात असलेला भूभाग अनुभवतहोतो, त्याचा सकाळी सकाळी अनुभव घेत होतो.
आम्हीं जर उशिरा निघालो असतो तर निसर्गाच्या सकाळच्या आविष्काराला मुकलो असतो. ठगांचा प्रवास दिसला नसता. छोट्या छोट्याझऱ्यांचा आवाज नीट ऐकू शकलो नसतो. गुलाबी थंडी - हवीशी वाटणारी - उपभोगता नसती आली. निर्मनुष्य रस्तेही आणि झोपड्याहीसुंदर असतात हे कळलं नसतं. मनात विचार आला कि 'बरं झालं संजीवनीचं ऐकलं'. जाता जाता सहज तिला विचारलं - अंघोळ कशीझाली? ती म्हणते - गार पाण्याने केली. किटलचा प्लग पंधरा अँपिअरचा तर स्विच बोर्ड पाच अँपिअरचा! - शेखर आणि मी परत एकदा(मनःपूर्वक) हसलो.
३०-३५ कि मी प्रवास दोन तास, थांबत थांबत केला. असो. पायथ्याशी ६-४५ ला पोहचलो आणि पहिला विजय मिळवला, वेळेनुसारपोहचलो. गड चढायला ७ वाजता सुरु केला.
Post a Comment